• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

आंजर्ले

आंजर्ले हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. कोकण विभागातील सर्वात सुरक्षित आणि रुंद समुद्रकिनाऱ्यांपैकी आंजर्ले एक आहे. हे ठिकाण कासव महोत्सवासारख्या इकोटूरिझम उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे.

जिल्हा/विभाग जिल्हा

रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत

ऐतिहासिक माहिती 

आंजर्ले हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात आहे. आंजर्ले निर्मळ, वाळुमय समुद्रकिनारे आणि कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. आंजर्ले हे नारळाच्या झाडांनी झाकलेले किनारे आणि कोकणी शैलीतील घरांसाठी प्रसिद्ध आहे. १२ व्या शतकात लाकडी खांबांनी बांधले गेले असे मानले जाणारे सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘कड्यावरचा गणपती यासाठी आंजर्ले यास ऐतिहासिक महत्त्व आहे.

भौगोलिक माहिती

आंजर्ले किनारपट्टी महाराष्ट्राच्या कोकण भागातील जोग नदीच्या मुखाजवळ वसलेली आहे. हि किनारपट्टी पूर्वेला सह्याद्री पर्वतांवर आणि पश्चिमेला निळ्या अरबी समुद्रावर नारळाच्या झाडांच्या हिरव्या थरांनी झाकलेली आहे. आंजर्ले दापोलीच्या वायव्येस २१.७ किमी, रायगडापासून ११८ किमी आणि मुंबईपासून २१५ किमी दूर आहे.

हवामान

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पाऊस, कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

हा समुद्रकिनारा खूप लांब, रुंद आणि शांत आहे. या किनाऱ्याचे इतर किनाऱ्यांसारखे पर्यटनाच्या अनुषंगाने अद्याप व्यापारीकरण झालेले नाही म्हणूनच कोकणातील इतर समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत तसेच इथल्या पर्यावरणीय महत्वामुळे इथे कमी वर्दळ असते. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि संवर्धकांना आकर्षित करते.

जवळची पर्यटनस्थळे

आंजर्लेसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

  • सुवर्णदुर्ग किल्ला: हा गौरवशाली किल्ला हरनाई किनाऱ्यापासून ०.२-०.३ किमी अंतरावर आठ एकर क्षेत्रात बांधला गेला. तो आंजर्लेच्या दक्षिणेस ७.८ किमीवर आहे.
  • कड्यावरचा गणपती: हे अतिशय सुंदर मंदिर समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात आहे, जिथून समुद्रकिनारा आणि आसपासच्या टेकड्यांचे भव्य दृश्य अनुभवता येते.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे

  • आंजर्लेला रस्त्याने आणि रेल्वेने पोहोचता येते. हे NH 66, मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन बस या मुंबईतून, पुण्यातून आणि रत्नागिरीतून दापोली पर्यंत उपलब्ध आहेत. दापोलीतून स्थानिक वाहतुकीद्वारे अंजर्ले येथे पोहोचता येते.
  • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई २२८ किमी.
  • जवळचे रेल्वे स्टेशन: खेड ५१.४ किमी.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री-खाद्य (सी-फुड) हे येथील वैशिष्ट्य आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • आंजर्ले येथे भरपुर हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत.
  • प्राथमिक आरोग्य सेवा अंजर्लेच्या उत्तरेस १.६ किमी अंतरावर आहे.
  • पोस्ट ऑफिस आंजर्ले पासून ०.३५ किमी अंतरावर आहे.
  • जवळचे पोलीस स्टेशन हरणाई येथे ७ किमी अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

सर्वात जवळील एमटीडीसी (MTDC) रिसॉर्ट ४१.१ किमी अंतरावर हरिहरेश्वर येथे आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

  • या ठिकाणी वर्षभर भेट देता येऊ शकते. फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत इथे कासव महोत्सव साजरा केला जातो. हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव आहे.
  • मान्सूनचा पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंत असतो. पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी