• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

बोर्डी समुद्रकिनारा

बोर्डी हे महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील डहाणू तालुक्यात वसलेले एक किनारी शहर आहे. हे ठिकाण शेती आणि परिसरासाठी ओळखले जाते ज्यात अनेक गुहा आणि मंदिरे आहेत. मुंबईतील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

जिल्हा/विभाग जिल्हा

 पालघर जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती

पारसी किंवा झोरास्ट्रियन लोकांसाठी हे धार्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे. त्यामुळे ते पारशी समाजात लोकप्रिय आहे. येथे झोरोस्ट्रियन लोकांचे भव्य अग्नि मंदिर देखील आहे. असे मानले जाते की अग्नि मंदिरातील आग जवळजवळ एक हजार वर्षे निरंतर धगधगत ठेवली गेली आहे. इराणी आणि पर्शियन संस्कृतीच्या अस्तित्वामुळे हे ठिकाण अधिक मोहक बनवते.

भौगोलिक माहिती

बोर्डी हे अरबी समुद्रावरील वहिंद्र नदी आणि घोलवड खाडीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोकण भागात स्थित एक किनारपट्टीचे ठिकाण आहे. हे मुंबईच्या उत्तरेस १५९ किमी आणि दमणच्या दक्षिणेस ३८.७ किमी आहे.

हवामान

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी 

समुद्रकिनाऱ्याची शांतता त्याच्या सौंदर्यात भर घालते. सूर्यास्ताच्या वेळी सोनेरी वाळूच्या बाजूने चालणे पर्यटकांना एक सुंदर अनुभव देते. समुद्रकिनारी बसून सूर्यस्नान घेता येते आणि किनाऱ्याच्या सौंदर्याचे कौतुक करता येते!

जवळची पर्यटनस्थळे

बोर्डीसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना करता येते

  • बहरोट लेणी: बोर्डीच्या पूर्वेला २६.५ किमी अंतरावर आहेत. इराणचा शहा अताश बेहरामसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या शौर्य गाथा ह्या गुहेत पाहावयास मिळतात. हि लेणी रमणीय आणि आकर्षक आहेत.
  • डहाणू समुद्रकिनारा: बोर्डीच्या दक्षिणेस १५.६ किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. डहाणू केवळ त्याच्या समुद्रकिनाऱ्यासाठीच नव्हे तर महालक्ष्मी मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे.
  • दापचारी धरण: बोर्डीपासून ३६ किमी दूर, हे धरण त्याच्या शांत परिसरासाठी प्रसिद्ध आहे. हा परिसर हिरवागार आहे, रोजच्या धक्काधकीच्या जीवनापासून दूर निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे.
  • केळवा समुद्रकिनारा: हा समुद्रकिनारा बोर्डीपासून ६९.६ किलोमीटर अंतरावर आहे. या सुंदर समुद्र किनाऱ्याची लांबी जवळजवळ ८ किमी आहे. तुम्ही समुद्रकिनारी फिरायला जाताना सुरू (कॅसुरीना) च्या झाडांनी वेढलेले असाल आणि दुसरीकडे एक विशाल निळा अरबी समुद्र आहे. समुद्रकिनाऱ्याजवळ अनेक सुंदर रिसॉर्ट्स आहेत.
  • मनोर: बोर्डी समुद्रकिनाऱ्यापासून ६५.६ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण इथल्या सुंदर रिसॉर्ट्स आणि वॉटर-पार्क्स साठी प्रसिद्ध आहे.
  • दमण: दमण पर्यटकांसाठी प्रचंड आकर्षणाचे ठिकाण आहे. निसर्गरम्य दृश्य आणि अखंड इतिहास याच्या आकर्षणाने ते भरलेले आहे. पूहे शहरा मध्ये पूर्वी पोर्तुगीजांची वसाहत होती, दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाला अरबी समुद्रातील काही सर्वात सुंदर समुद्रकिनारे लाभले आहेत.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे

  • बोर्डीला रस्त्याने आणि रेल्वेने जाता येते. हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH 48), डहाणू-जव्हार महामार्गावर आहे. हे मुंबईपासून १५९ किलोमीटर अंतरावर आहे, या ठिकाणी जाण्यासाठी कार भाड्याने घेता येऊ शकते.
  • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १४५ किमी.
  • जवळचे रेल्वे स्टेशन: घोलवड २.८ किमी.

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने मासे आणि पारशी खाद्यसंस्कृती येथील वैशिष्ट्य आहे. हे सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबईशी जोडलेले आहे, इथल्या रेस्टॉरंट्स मध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ मिळतात. 

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन

बोर्डीमध्ये अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. अनेक पारशी लोक आपली घरे पर्यटकांना भाड्याने देतात.प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच रुग्णालये उपलब्ध आहेत.गावात पोस्ट ऑफिस आहे.जवळचे पोलीस स्टेशन समुद्र किनाऱ्यापासून १.१ किलोमीटर अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट

एमटीडीसी (MTDC) शी सलग्न हॉटेल्स केळवा बीच जवळ आहेत.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंत असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.हिवाळा इतर किनारपट्ट्यांच्या तुलनेत जास्त थंड असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा

पारसी, मराठी, हिंदी, इंग्रजी