• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

दिवेआगर (रत्नागिरी)

दिवेआगर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. हा किनारा कोकण विभागातील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हे ठिकाण हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांजवळ आहे.

जिल्हा/विभाग जिल्हा

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत

ऐतिहासिक माहिती

दिवेआगर हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात एक गाव आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे सुवर्ण गणेश मंदिरातील गणपतीच्या सोन्याच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी ही सोन्याची मूर्ती चोरीला गेली होती. समुद्रकिनारा अंदाजे ४ किमी लांब आहे आणि तो फार मानवी हस्तक्षेप न झालेल्या समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे, म्हणून  तिथली  शुद्धता आणि स्वच्छता अबाधित आहे.

भौगोलिक माहिती

दिवेआगर हे महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातील एक किनारपट्टीचे ठिकाण आहे ज्याच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे अलिबाग शहराच्या दक्षिणेस ८१ किमी मुंबईपासून १८२ किमी दूर आणि पुण्यापासून १६३ किमी दूर आहे

हवामान

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी 

दिवेआगर... नारळ, सुरू (कॅसुरीना) आणि सुपारीच्या झाडांनी झाकलेल्या आणि फार मानवी हस्तक्षेप न झालेल्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे शांत आहेत. आराम करण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या चित्तथरारक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. शनिवार व रविवारच्या सुट्टीसाठी तसेच पिकनिकसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. पॅरासेलिं

जवळची पर्यटनस्थळे

दिवेआगरसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

  • श्रीवर्धन: दिवेआगरच्या दक्षिणेस २३ किमी दूर. सुंदर, लांब आणि स्वच्छ समुद्रकिनारा. श्रीवर्धन हे दिवेआगरशी सुंदर किनारपट्टी रस्त्याने जोडलेले आहे.
  • हरिहरेश्वर: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यापासून ३ किमी दक्षिणेस, हे ठिकाण प्राचीन शिव आणि काळभैरव मंदिरासाठी ओळखले जाते. हे खडकाळ समुद्रकिनारा आणि किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
  • वेळास किनारा: हरिहरेश्वरच्या दक्षिणेला १२ किमी दूर, कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध.
  • भरडखोल: दिवेआगरच्या दक्षिणेस ७ किमी अंतरावर असलेलं प्रसिद्ध मासेमारी गाव.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे

  • दिवेआगर येथे रस्ते आणि रेल्वेने पोहोचता येते. हे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गावर आहे. महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस मुंबई, पुणे, श्रीवर्धन आणि पनवेल येथून दिवेआगरसाठी उपलब्ध आहेत.
  • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १८९ किमी.
  • जवळचे रेल्वे स्टेशन: माणगाव ४८ किमी

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने सी-फुड (मासे आणि इतर स्थानिक पदार्थ) इथले वैशिष्ट्य आहे. दिवेआगर उकडीचे मोदकासाठी प्रसिद्ध आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन

  • अनेक निवास पर्याय हॉटेल्स, रिसॉर्ट्स तसेच होमस्टेच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
  • शासकीय रुग्णालय दिवेआगर पासून ५.२ किमी अंतरावर आहे.
  • दिवेआगर येथे पोस्ट ऑफिस आहे.
  • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन ४.७ किमी अंतरावर दिघी येथे आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट

हरिहरेश्वरमध्ये एमटीडीसी (MTDC) रिसॉर्ट उपलब्ध आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंत असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • हिवाळा इतर किनारपट्ट्यांच्या तुलनेत जास्त थंड असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा

इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी