• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

दिवेआगर

दिवेआगर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. हा कोकण विभागातील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हे ठिकाण हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्रकिनारा जवळ आहे.

जिल्हे/ प्रदेश 

रायगड जिल्हा.

इतिहास       

दिवेआगर हे महाराष्ट्रातील कोकण भागातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एक गाव आहे. हे ठिकाण त्याच्या स्वच्छ आणि वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. सुवर्ण गणेश मंदिरासाठी सोन्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीसाठी ओळखले जात होते. येथील समुद्रकिनारा अंदाजे ४ किमी लांब आहे आणि तो महाराष्ट्रातील अस्पर्शित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. जेट-स्कीइंग, बनाना बोट, स्पीड बोटी, पॅरासेलिंग इत्यादी साहसी क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे.

                  

भूगोल

दिवेआगर हे महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेले किनारपट्टीवरील ठिकाण असून एका बाजूला हिरव्यागार सह्याद्री पर्वतआणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे अलिबाग शहराच्या दक्षिणेस ८१ किमी, मुंबईच्या दक्षिणेस १८२ किमी आणि पुण्याच्या नैऋत्येस १६३ कि.मी.

हवामान       

या प्रदेशातील प्रमुख हवामान म्हणजे पर्जन्यमान, कोकण पट्ट्यात उच्च पर्जन्य (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवले जाते आणि हवामान दमट आणि उबदार राहते. या हंगामात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते (सुमारे २८अंश सेल्सिअस) आणि हवामान थंड आणि कोरडे राहते.

करायच्या गोष्टी       

पॅरासेलिंग, बोटिंग, बनाना राइड्स, जेट स्कीइंग, बंपर राइड, नेचर ट्रेल, बीच व्हॉलीबॉल, हॉर्स रायडिंग, बीचसाइड कॅम्पिंग तसेच बग्गी राइड्स इत्यादी उपक्रम उपलब्ध आहेत.याशिवाय दिवेआगर नारळ, सुरु (कॅसुआरिना) आणि सुपारीच्या झाडांनी झाकलेल्या अस्पर्शित समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारे स्वच्छ आणि शांत आहेत. आराम करण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या मंत्रमुग्ध दृश्यांचा आनंद घेण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण. वीकेंड गेटवे तसेच पिकनिकसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

जवळचे पर्यटन स्थळ        

दिवेआगरसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना करू शकता

● श्रीवर्धन: दिवेआगरच्या दक्षिणेस २३ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी सुंदर, लांब आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हे दिवेआगरशी सुंदर किनारपट्टी रस्त्याने जोडलेले आहे. श्रीवर्धन बीचवरील लोकप्रिय उपक्रम बोटिंग, नौकायन, पोहणे, बीच व्हॉली आणि समुद्रकिनारी सोनेरी वाळूवर चालणे.

● हरिहरेश्वर: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यापासून ३७ किमी दक्षिणेस स्थित. हे ठिकाण प्राचीन शिव आणि काळभैरव मंदिरासाठी ओळखले जाते. हे त्याच्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यासाठी आणि किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरील प्रवाशांमध्ये काही प्रसिद्ध उपक्रम म्हणजे नौकाविहार, नौकायन, पोहणे, बीच व्हॉली आणि बीच चालणे.

● वेलास बीच: हरिहरेश्वरच्या दक्षिणेला १२ कि.मी. अंतरावर वसलेले, कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध. दरवर्षी निसर्गप्रेमी येथे कासव उत्सवाचा अनुभव घेण्यासाठी येतात जिथे कासवांची हॅचलिंग्स अरबी समुद्रात सोडली जातात.

● भरडखोल: दिवेआगरच्या दक्षिणेला ७ किमी अंतरावर असलेले प्रसिद्ध मासेमारी गाव

अंतर आणि आवश्यक वेळेसह रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळाचा प्रवास कसा करावा

दिवेआगर रस्ते आणि रेल्वेने जोडलेले आहे. हे राष्ट्रीय महामार्ग 66, मुंबई - गोवा महामार्गाशी जोडलेले आहे.  मुंबई, पुणे, श्रीवर्धन आणि पनवेल ते दिवेआगर या राज्य परिवहन बसेस उपलब्ध आहेत.

सर्वात जवळील विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १८९ कि.मी.

सर्वात जवळील रेल्वे स्थानक: माणगाव ४८ किमी (१ तास २० मि.)

विशेष खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल     महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असल्यामुळे समुद्री अन्न हे येथे एक वैशिष्ट्य आहे. समुद्री अन्नाबरोबरच हे ठिकाण उकडीचे मोदक यासाठी प्रसिद्ध आहे.

निवास सुविधा जवळ आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट   

  • हॉटेल्स, रिसॉर्टतसेच होमस्टेच्या स्वरूपात निवासाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.
  • कार्यालय/पोलीस स्टेशन सरकारी रुग्णालय दिवेआगरपासून ५. २ किमी अंतरावर आहे.
  • दिवेआगर येथे पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे.
  • सर्वात जवळील पोलिस स्टेशन ४. ७ किमी अंतरावर दिघी येथे आहे.

जवळच MTDC रिसॉर्ट      

हरिहरेश्वरमध्ये सर्वात जवळचे एमटीडीसी रिसॉर्ट उपलब्ध आहे.

भेट देण्याचा नियम आणि वेळ, भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

ह्या ठिकाणी वर्षभर भेट देता येते. भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च अशी आहे. जून ते ऑक्टोबर पर्यंत भरपूर पाऊस पडतो आणि उन्हाळ्यात वातावरण फार उष्ण आणि दमात असते.  पावसाळ्यात पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळेची माहिती घेणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या हंगामात समुद्राला भरती येणे धोकादायक असू शकते म्हणून ते टाळले पाहिजे.

                  

परिसरात बोलली जाणारी भाषा    

इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी