• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

गणपतीपुळे समुद्रकिनारा

गणपतीपुळे हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि गणपतीची मूर्ती ‘स्वयंभू आणि अंदाजे ४०० वर्षे जुनी आहे

जिल्हा/विभाग        

रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

असे मानले जाते की हे मंदिर ४०० पेक्षा जास्त वर्षे जुने आहे. बालभटजी भिडे यांना गणपतीची मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना गावच्या किनाऱ्यावर असलेल्या एका छोट्या टेकडीच्या पायथ्याशी केली. टेकडीचा आकार देखील गणपती सारखा आहे. मूर्ती पश्चिम दिशेला आहे. तिला पश्चिम द्वारपालक म्हणूनही ओळखले जाते. गणेशोत्सवाच्या वेळी, गणपतीपुळे आणि आसपासच्या गावे जसे  मालगुंड, जयगड मधील लोक स्वतंत्रपणे सण साजरा करत नाहीत; सर्व लोकं  एकत्र येतात आणि या मंदिरातच गणपतीची पूजा करतात.

भौगोलिक माहिती   

गणपतीपुळे हे महाराष्ट्राच्या कोकण भागातील किनारपट्टी आहे जिच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे रत्नागिरी शहराच्या उत्तरेस २५ किमी, कोल्हापूरपासून १५३ किमी आणि मुंबईपासून ३७५ किमी दूर आहे. इथे पोहोचण्यासाठी रस्त्याने जाता येते.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

गणपतीपुळेला सुमारे १२ किमी लांब आणि विस्तृत किनारपट्टी आहे. समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आहे आणि पांढरी वाळू आहे जी संपूर्ण महाराष्ट्र तसेच आसपासच्या राज्यांतील पर्यटकांना आकर्षित करते. समुद्रकिनाऱ्यावर घोड्यांच्या गाड्यांशिवाय जल क्रीडा उपक्रम देखील उपलब्ध आहेत.

पर्यटनाव्यतिरिक्त गणपतीपुळेला गणेशाचे मंदिर असल्याने धार्मिक महत्त्व आहे.

जवळची पर्यटनस्थळे        

गणपतीपुळे सोबत खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

  • जयगड: जयगड किल्ला १६ व्या शतकात बांधण्यात आला होता. गणपतीपुळेपासून शास्त्री खाडीजवळ २० किमी अंतरावर जयगड किल्ला आहे, इथे दीपगृह देखील आहे.
  • आरे-वारे किनारा: हे सुंदर जुळे समुद्रकिनारे गणपतीपुळेपासून १० किमी अंतरावर आहेत.
  • मालगुंड: प्रसिद्ध मराठी कवी ‘केशवसुत यांचे जन्मस्थान, गणपतीपुळेपासून १ किलोमीटर अंतरावर आहे.
  • पावस: हे ठिकाण आध्यात्मिक नेते स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे, जे गणपतीपुळेपासून ४१ किमी दूर आहे

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

  • गणपतीपुळेला रस्त्याने पोहोचता येते, हे NH 66, मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सांगली या शहरांमधून बस उपलब्ध आहेत.
  • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ३३२ किमी
  • जवळचे रेल्वे स्टेशन: रत्नागिरी रेल्वे स्टेशन ३० किमी

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने सी-फुड (मासे आणि इतर स्थानिक पदार्थ) इथले वैशिष्ट्य आहे. तसेच, पर्यटकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबईशी जोडलेले आहे, येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती देतात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • अनेक निवास पर्याय हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत.
  • मालगुंड येथे ३ किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध आहे.
  • गणपतीपुळे गावात पोस्ट ऑफिस आहे.
  • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन २२.६ किलोमीटर अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

गणपतीपुळे येथे एमटीडीसी रिसॉर्ट उपलब्ध आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • पाऊस जून ते ऑक्टोबर पर्यंत असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • हिवाळा इतर किनारपट्ट्यांच्या तुलनेत जास्त थंड असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी