• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात भारताच्या पश्चिम घाटावर आहे. हा एक डोंगराळ गड आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक आहे.  मुख्य आकर्षण म्हणजे कोकणकडा येथील सूर्यास्ताचे दृश्य.

जिल्हे/ प्रदेश 

अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

इतिहास       

हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज भागातील कोथळे गावात आहे. ऐतिहासिक दृष्ट्या हा गड माळशेजघाटाशी संबंधित आहे ज्याने आजूबाजूच्या प्रदेशाचे रक्षण आणि नियंत्रण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हा किल्ला ६ व्या शतकात, कलाचुरी घराण्याच्या कारकिर्दीत बांधला गेला. या गडात ११ व्या शतकातील विविध गुहा, भगवान शिव आणि विष्णूच्या मूर्ती धारण करणारी मंदिरे आहेत. नंतरच्या काळात मुघलांकडून मराठ्यांनी पुन्हा या गडावर नियंत्रण मिळवले.  येथील शिव मंदिरावर एक मोठा खडक आहे आणि त्याच्या सभोवतालचे चार खांब पाण्याच्या तलावातील गुहेला आधार देतात. या बाबत अशी आख्यायिका आहे कि हे चार खांब सत्य, त्रेता, द्वापार आणि कली या चार युगाचे प्रतिनिधित्व करतात. असे मानले जाते की प्रत्येक युगाच्या शेवटी एक खांब स्वतःहून तुटतो. किल्ल्यावरील विविध बांधकामे येथील विविध संस्कृतींच्या खुणा दर्शवितात.

भूगोल

हरिश्चंद्रगड पुणे, ठाणे आणि अहमदनगरच्या सीमारेषेवर आहे. हा गड माळशेजघाटाजवळील जुन्नर भागात आहे. खिरेश्वर गावापासून ८ किमी अंतरावर, भंडारापासून ५ किमी, पुण्यापासून १६६ किमी आणि मुंबईपासून २१८ कि.मी. येथील डोंगर रांगेची उंची समुद्रसपाटीपासून ४७१० फूट उंचीवर असून कोकणकडा (कड्याची) उंची ३५०० फूट आहे. हरिश्चंद्राची तारामती (सर्वोच्च), रोहिदास आणि हरिश्चंद्र ही ३ शिखरे आहेत. या किल्ल्याला विविध वनस्पती आणि प्राणिमात्रांसह डोळ्यांचे पारणे फिटेल असे नैसर्गिक सुंदरता मिळाली आहे. हा ट्रेक तुम्हाला वनविभाग, भातशेती, मोठे खडकांचे ठिपके, उंच पर्वत आणि लहान ओढे यांचे दर्शन घडवेल.

हवामान       

या प्रदेशात वर्षभर उष्ण-अर्ध-शुष्क हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.

एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण महिने असतात जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

हिवाळा अत्यंत तीव्र असतो आणि रात्री तापमान १० अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.

प्रदेशात वार्षिक पाऊस सुमारे ७६३ मिमी आहे.

                  

करायच्या गोष्टी       

हरिश्चंद्रगडासह खालील ठिकाणी भेट देऊ शकता:

● केदारेश्वर गुहा - प्राचीन भारतातील दगडातून शिल्पे कोरण्याच्या ललित कलेचे हे मंदिर एक अद्भुत उदाहरण आहे. मंगल गंगा नदीचा उगम मंदिराच्या जवळ असलेल्या एका टाक्यातून झाल्याचे सांगितले जाते.

● कोकण कडा - हरिश्चंद्रगड येथील एक विशाल खडक जो कोकण आणि सूर्यास्ताचे नेत्रदीपक दृश्य पाहता येते.

● केदारेश्वर गुहेत- या गुहेतील शिवलिंग बर्फा सारख्या थंड पाण्याने वेढलेले आहे. पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर पाण्याने बुडाल्यामुळे ही गुहा उपलब्ध होत नाही.

● तारामती शिखर- तारामाची म्हणून ओळखला जाणारा हा गडावरील  सर्वात वरचा बिंदू आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. या शिखरापलीकडील जंगलात बिबट्या दिसतात. या ठिकाणाहून नाणेघाटाची संपूर्ण रेंज आणि मुरबाडजवळील बाले-यांची झलक आपल्याला पाहायला मिळू शकते.

जवळचे पर्यटन स्थळ        

आपण एका दिवसासाठी हरिश्चंद्रगड सहल करू शकता. यात एक्सप्लोर करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. तथापि, आपल्याला हवे असल्यास इतर किल्ले आणि भेट देण्याची ठिकाणे आहेत. त्यापैकी काही आहेत:

● पिंपळगावजोगे धरण (८. ४ कि.मी.) : ओतूर, जुन्नर, नारायणगाव आणि आळेफाटा सारख्या भागांना पाणी पुरवणारे हे पुष्पवती नदीवरील धरण आहे. ट्रेक पूर्ण केल्यानंतर तुम्ही धरणाला भेट देऊ शकता आणि तलावाच्या बाजूला राहू शकता. आपला तंबू घेऊन तिथेही तळ ठोका.

● रिव्हर्स धबधबा (१५ किमी) : ही एक पर्वतरांग आहे जिथे पाणी उलट्या दिशेने वाहते. याचे कारण पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे. हरिश्चंद्रगड ट्रेक संपल्यानंतर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

● अमृतेश्वर मंदिर : हे राजा झांज यांनी बांधलेले शिवमंदिर आहे. हे १२०० वर्षांहून अधिक जुने मानले जाते. या मंदिरात काळ्या आणि लाल दगडांनी बांधलेले काही सुंदर खडकाळ कोरीव काम आहे. हे ठिकाण महाराष्ट्राचे काश्मीर म्हणूनही ओळखले जाते. तर, केवळ सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या मंदिराला भेट दिली पाहिजे.

● माळशेज घाट (५. ३ किमी): सुंदर बांधलेले धरण आणि उंच, उदात्त किल्ल्यांपर्यंत मंत्रमुग्ध करणारे धबधबे, माळशेज घाट निसर्ग प्रेमींच्या आनंदासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. खडकाळ भाग, हिरवीगार झाडे आणि धुळीच्या थरांमधून डाइविंग करणे या सारखा आनंद घेता येतो.

अंतर आणि आवश्यक वेळेसह रेल्वे, हवाई, रस्ता (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळाचा प्रवास कसा करावा

  • मुंबईपासून अंदाजे २०१ किमी  अंतरावर, येथे पोहोचण्यासाठी NH३ चे अनुसरण करून सामान्य रहदारी दिवशी ४ तास आणि ३० मिनिटांच्या आत येथे पोहोचता येते घोटी-शुक्लतीर्थ रोड किंवा खंबाळे येथील नागपूर-औरंगाबाद-मुंबई महामार्ग. मुंबईहून कल्याण, खुबीफाटा ते खिरेश्वर हा सर्वात चांगला मार्ग आहे. तुम्ही शिवाजीनगर एसटी बस स्टँड (पुणे) पासून खिरेश्वर गावापर्यंत रोज बसने जाऊ शकता. वैकल्पिकरित्या, कल्याणहून बसने  माळशेजघाटमार्गे आळेफाटा येथे जाता येते.
  • सर्वात जवळील रेल्वे स्थानक इगतपुरी आहे, जे ४१ किमी (१ तास २० मि.) अंतरावर आहे
  • मुंबईतील छत्रपती शिवाजी विमानतळ हे १५४किमी (४तास २५ मि.) येथील सर्वात जवळचे विमानतळ आहे.

विशेष खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल

  • महाराष्ट्रीयन जेवण झुणका भाकर हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे, किल्ल्यावर अन्न उपलब्ध नसले तरी. जवळच्या हॉटेल्समध्ये जेवण मिळू शकते.

  • निवास सुविधा जवळ आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट
  • किल्ल्याच्या परिसरात खूप कमी हॉटेल्स उपलब्ध आहेत.
  • कार्यालय/पोलीस स्टेशन        सर्वात जवळचे हॉस्पिटल ९३ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस १२. ४ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन ९५ किमी अंतरावर आहे.

भेट देण्याचा नियम आणि वेळ, भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

  • या ठिकाणी भेट देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही.
  • किल्ला आणि प्रेक्षणीय स्थळांचा आनंद घेण्यासाठी हरिश्चंद्रगडाला भेट देण्याची ऑक्टोबर ते मार्च ही सर्वोत्तम वेळ आहे. तथापि, येथे खूप पाऊस पडतो त्यामुळे नैसर्गिक धबधबे आणि ओसंडून वाहणाऱ्या धरणांचा आनंद घेऊ शकतो.
  • पावसाच्या दिवशी ट्रेकिंगची शिफारस केली जात नाही कारण उतार खूप निसरडे होऊ शकतात.

परिसरात बोलली जाणारी भाषा    

इंग्रजी, हिंदी, मराठी.