• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

किहिम (रायगड)

किहिम हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अलिबागच्या परिसरात असलेले एक छोटे किनारपट्टी शहर आहे. हे ठिकाण समुद्रकिनारा, विखुरलेले शिंपले आणि नारळाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. शनिवार व रविवार दरम्यान या ठिकाणाला मुंबई आणि पुण्यातील पर्यटक भेट देतात.

जिल्हा/विभाग        

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत १७ व्या शतकात किहिम गाव विकसित झाले. हा समुद्रकिनारा अनेक पर्यटकांना अज्ञात असल्यामुळे हा किनारा अतिशय स्वच्छ आहे.

भौगोलिक माहिती   

किहिम हे महाराष्ट्राच्या कोकण भागात सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या मध्ये स्थित एक किनारपट्टी ठिकाण आहे. हे अलिबागच्या उत्तरेस १२ किमी, मुंबईपासून ९७ किमी दूर आणि पुण्यापासून १६९ किमी दूर आहे.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

  • जसे पॅरासेलिंग, बनाना बोट राईड्स, बंपर राईड्स, जेट स्कीइंग, सर्फिंग, कयाकिंग, फिशिंग इ. जलक्रीडा इथे होतात.
  • समुद्रकिनाऱ्यावर घोडेस्वारी आणि बग्गी देखील उपलब्ध आहेत.

जवळची पर्यटनस्थळे        

  • किहिम बीचच्या दक्षिणेला १२.८ किमी दूर, कुलाबा किल्ला अलिबागच्या किनाऱ्यापासून समुद्रात आहे.
  • अरबी समुद्रात वसलेला खांदेरी किल्ला
  • किहीमच्या १२ किमी दक्षिणेस अलिबाग जे मिनी गोवा म्हणून ओळखलं जातं आणि जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.
  • आक्षी बीच, किहिमच्या दक्षिणेस १८ किलोमीटर अंतरावर आहे जो पर्यटकांना त्याच्या सौंदर्यासाठी आकर्षित करतो.
  • वरसोली समुद्रकिनारा, पर्यटकांनी कमी भेट दिलेला समुद्रकिनारा, किहिमच्या दक्षिणेस ११.३ किलोमीटर अंतरावर भारतीय सैन्याचा प्रसिद्ध नौदल तळ इथे आहे.
  • कणकेश्वर मंदिर, बिर्ला मंदिर, आंग्रे समाधी अशी ठिकाणे किहिम बीचच्या परिसरात आहेत.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

  • जवळचे रेल्वे स्टेशन: पेण ३५ किमी
  • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १०४ किमी
  • रस्त्याने: किहिम NH 66, मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहनाच्या बसेस, आणि कॅब मुंबई आणि इतर शहरांमधून अलिबागसाठी उपलब्ध आहेत
  • जलमार्ग: गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा पर्यंत फेरी.
  • मांडवा पासून, स्थानिक कार आणि ऑटो-रिक्षा किहिमसाठी उपलब्ध आहेत

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री खाद्य  पदार्थ (सी-फुड) हे  येथील वैशिष्ट्य आहे. हे सर्वात जास्त भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक असल्याने आणि मुंबईशी जोडलेले येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती देतात. मेनूमध्ये प्रामुख्याने भात आणि माशांचे पदार्थ प्रामुख्याने मिळतात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • अनेक निवास पर्याय हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे उपलब्ध आहेत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल २.९ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस मापगाव येथे ५.४ किमी अंतरावर उपलब्ध आहे.
  • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन ६.२ किमी अंतरावर झिरड येथे आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

अलिबाग येथे (MTDC) रिसॉर्ट उपलब्ध नाही.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू