• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

मांडवा

मांडवा हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले एक छोटे किनारपट्टी गाव आहे. मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी शनिवार रविवारच्या सुट्टीचा एक उत्तम पर्याय. विश्रांतीसाठी आणि समुद्रकिनाऱ्यावरील उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

जिल्हा/विभाग        

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

मांडवा महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यात आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईहून फेरी वापरून तीथे सहजपणे पोहोचता येते. त्यामुळे मुंबईकरांसाठी सुट्टीसाठी चांगले ठिकाण बनते.  

भौगोलिक माहिती   

मांडवा हे महाराष्ट्राच्या कोकण भागातील कारंजा खाडी आणि अलिबाग दरम्यान एक किनारपट्टीचे ठिकाण आहे. त्याच्या एका बाजूला हिरवेगार सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला निळा अरबी समुद्र आहे. हे मुंबईच्या दक्षिणेस १०५ किमी आणि पुण्याच्या पश्चिमेस १८३ किमी अंतरावर आहे.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

  • मांडवा जलक्रीडा उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे जसे की पॅरासेलिंग, बनाना बोट राइड, जेट-स्कीइंग, सर्फिंग इत्यादी.
  • हे ठिकाण कॅम्पिंग तसेच मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे.
  • घोडे, उंट आणि बग्गी देखील समुद्र किनाऱ्यावर जॉयराइडसाठी उपलब्ध आहेत.

जवळची पर्यटनस्थळे        

मांडवा सोबत खालील पर्यटन स्थळांना भेट देता येते.

        किहिम बीच: मांडवाच्या दक्षिणेस १३.१ किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी एक सुंदर समुद्रकिनारा आहे जिथून सूर्यास्ताचा आनंद घेता येतो.

        अलिबाग: मांडवाच्या दक्षिणेस १८.२ किमी अंतरावर आहे आणि 'मिनी गोवा' म्हणून प्रसिद्ध आहे. जलक्रीडा आणि त्याच्या अलिबागच्या संस्कृतीशी संबंधित सर्व उपक्रमांमुळे प्रसिद्ध ठिकाण मानले जाते.

        कुलाबा किल्ला: अरबी समुद्रात मांडवाच्या दक्षिणेस २०.६ किमी अंतरावर आणि चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला हा किल्ला. ३०० पेक्षा जास्त वर्षे जुना हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणापैकी एक आहे.

        कोरलाई किल्ला: मांडवा समुद्रकिनाऱ्यापासून ४८.८ किमी दक्षिणेस स्थित, पोर्तुगीजांनी बांधलेल्या प्रचंड किल्ल्यांपैकी हा एक किल्ला जिथे सात हजार घोडे सामावू शकतात.

        फणसाड पक्षी अभयारण्य: रेवदंडा-मुरुड रस्त्यामार्गे मांडवापासून ५९.९ किमी अंतरावर आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

  • मांडव्याला रस्ते, रेल्वे तसेच जलमार्गाने जाता येते. राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहनाच्या बसेस, आणि कॅब मुंबई ते मांडवा उपलब्ध आहेत.
  • गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा या फेरी देखील उपलब्ध आहेत.
  • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई ११३ किमी (३ तास ३६ मिनिटे)
  • जवळचे रेल्वे स्टेशन: पेण ४२.९ किमी (१ तास १२ मिनिटे)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री अन्न पदार्थ (सी-फुड) पदार्थ हे येथील वैशिष्ट्य आहे. तथापि, हे सर्वात भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबईशी जोडलेले आहे, येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती देतात.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • मांडवामध्ये अनेक हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत.
  • १३.४ किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र फोफेरीमध्ये उपलब्ध आहे.
  • सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे आहे.
  • सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस ढोकावडे मध्ये मांडवापासून ३ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन मांडवाच्या दक्षिणेस झिरड येथे ७.३ किलोमीटर अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

अलिबागमध्ये एमटीडीसी रिसॉर्ट आणि कॉटेज उपलब्ध नाहीत.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू