नागाव - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
नागाव
नागाव हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले एक छोटे किनारपट्टीचे शहर आहे. मुरुड, अलिबाग, किहीम, मांडवा आणि आक्षी सारख्या आसपासच्या किनाऱ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांना सहलीसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.
जिल्हा/विभाग
रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
ऐतिहासिक माहिती
नागाव हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यात आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
भौगोलिक माहिती
नागाव हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात (कोकण प्रदेश) सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्राच्या मध्ये स्थित एक किनारपट्टीचे ठिकाण आहे. मुंबईपासून १०२ किमी आणि पुण्यापासून १७४ किमी दूर आहे.
हवामान
या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.
इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.
करण्यासारख्या गोष्टी
पॅरासेलिंग, बनाना बोट राईड्स, मोटरबोट राईड्स, जेट स्कीइंग, सर्फिंग इत्यादी जलक्रीडा उपक्रमांसाठी नागाव प्रसिद्ध आहे.
पाणी शांत असल्याने पोहणे आणि बोटिंगसाठी आदर्श आहे.
घोडे, उंट, बग्गी देखील समुद्र किनाऱ्यावर सावरीसाठी उपलब्ध आहेत.
जवळची पर्यटनस्थळे
नागाव जवळील पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे आहेत.
- रेवदंडा समुद्रकिनारा आणि किल्ला: नागावच्या दक्षिणेस १२ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण पोर्तुगीज किल्ला आणि समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
- कोरलाई किल्ला: नागाव समुद्रकिनाऱ्यापासून १५.९ किमी दक्षिणेस आहे, पोर्तुगीजांनी बांधलेल्या सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला ज्यात सात हजार घोडे सामावू शकतात.
- फणसाड वन्यजीव अभयारण्य: अलिबाग रेवदंडा रस्त्याने नागाव पासून ३४.७ किमी अंतरावर आहे.
- कोलाबा किल्ला: चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या अरबी समुद्रात वसलेला हा ३०० पेक्षा अधिक वर्ष जुना किल्ला पर्यटकांच्या आकर्षणापैकी एक आहे.
- काशीद समुद्रकिनारा: आसपासच्या भागातील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक, नागावच्या दक्षिणेस २५.५ किलोमीटर अंतरावर आहे.
- वरसोली समुद्रकिनारा: पर्यटकांनी कमी भेट दिलेला समुद्रकिनारा, जो भारतीय लष्कराचा नौदल तळ म्हणून प्रसिद्ध आहे.
- मुरुड जंजिरा किल्ला: हा किल्ला १७ व्या शतकात बांधण्यात आला होता आणि मुरुडच्या किनाऱ्यापासून ५० किमी अंतरावर समुद्रात आहे.
रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे
- नागावला रस्ते, रेल्वे आणि जलमार्गाने जाता येते. राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहनच्या बसेस आणि कॅब मुंबई पासून अलिबाग पर्यंत उपलब्ध आहेत, तेथून टॅक्सी आणि ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत.
- गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा पर्यंत फेरी उपलब्ध आहे. मांडवा येथून स्थानिक गाड्या नागावकडे उपलब्ध आहेत.
- जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १०८ किमी (३ तास २ मिनिटे)
- जवळचे रेल्वे स्टेशन: पेण ३६ किमी (५८ मिनिटे)
खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स
महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री अन्न पदार्थ (सी-फुड) येथील वैशिष्ट्य आहे. तथापि, हे सर्वात भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि मुंबईशी जोडलेले आहे, येथील रेस्टॉरंट्स विविध प्रकारच्या पाककृती देतात.
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
- हॉटेल्स, रिसॉर्ट्स, कॉटेज आणि होमस्टे अशी निवासाची सोय उपलब्ध आहे.
- अलिबागमध्ये रुग्णालये उपलब्ध आहेत.
- जवळचे पोस्ट ऑफिस ३ किमी अंतरावर आहे.
- सर्वात जवळचे पोलीस स्टेशन अलिबाग जवळ ९.८ किमी अंतरावर आहे.
जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट
MTDC रिसॉर्ट आणि कॉटेज अलिबाग जवळ उपलब्ध नाहीत.
पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ
- हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
- जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
- पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
- पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.
या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू
Gallery
How to get there

By Road
Nagaon is accessible by road, railways and waterways. It is connected to NH 66, Mumbai Goa Highway. State transport, buses and cabs are available from Mumbai to Alibaug, from there taxis and auto-rickshaws are available. The ferry is available from Gateway of India to Mandwa. From Mandwa, local cars are available to Nagaon

By Rail
Nearest Railway Station: Pen 36 KM (58min)

By Air
Nearest Airport: Chhatrapati Shivaji Maharaj Airport Mumbai 108 KM (3hr 2mins)
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
diot@maharashtratourism.gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS