निंबोली उन्हाळे (गरम पाण्याचे झरे) - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
निंबोली उन्हाळे (गरम पाण्याचे झरे)
३-४ ओळींमध्ये पर्यटकांचे गंतव्यस्थान / ठिकाणाचे नाव आणि ठिकाणाविषयीचे थोडक्यात वर्णन
निंबोली उन्हाळे (गरम पाण्याचे झरे) वज्रेश्वरी गरम पाण्याच्या झऱ्यांपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबोली गावात आहेत. हे नैसर्गिक झरे आहेत आणि ठाणे जिल्ह्यातील तानसा नदीच्या काठावर सापडलेल्या अनेकपैकी एक आहे.
जिल्हे/प्रदेश
ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
इतिहास
निंबोली गरम पाण्याचे झरे वनस्पती आणि प्राण्यांनी वेढलेले आहेत आणि चहुबाजूला स्वच्छ पाण्याचे झरे आहेत. पारंपारिक किंवा पौराणिक मान्यतेनुसार, गरम पाणी हे स्थानिक देवतेने मारलेल्या पिशाच्च आणि राक्षसांचे रक्त आहे.
भूगोल
हे भिवंडी तहसीलमधील तानसा नदीच्या काठावरील निंबोली गावात आहे. हे ठाण्याच्या उत्तरेस अंदाजे ५० किमी आणि विरारच्या पूर्वेला ३० किमी आहे.
हवामान/वातावरण
या ठिकाणी हवामान उष्ण व दमट असुन भरपूर पाऊस पडतो, कोकण पट्ट्यात भरपुर म्हणजेच सरासरी २५०० मिमी ते ४५०० मिमी इतका पाऊस पडतो. या हंगामात तापमान ३० अंश सेल्सियस पर्यन्त पोचते.
उन्हाळ्यात हवामान गरम आणि दमट असते, आणि तापमान ४० अंशापर्यन्त पोचते.
हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान असते (सुमारे २८ अंश ) आणि वातावरण थंड आणि कोरडे राहते.
करावयाच्या गोष्टी
हे ठिकाण यात्रेकरूंमध्ये लोकप्रिय आहे आणि त्याच्या गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी पसंत केले जाते. गरम पाण्याच्या झऱ्यांच्या आसपास बरीच पवित्र ठिकाणे आहेत जिथे बरेच भक्त येतात. इतर उपक्रम जसे ट्रेकिंग, हायकिंग आणि सायकल राईडिंग करता येते.
जवळचे पर्यटन स्थळ
वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा: त्याच्या गरम झऱ्यांसह, यात्रेकरू आणि कुटुंबे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती घेण्यासाठी शनिवारी-रविवारी येतात.
गणेशपुरी: गणेशपुरी हे धार्मिक स्थळ आहे. यात अनेक मंदिरे आणि गरम पाण्याचे झरे आहेत ज्यांना आध्यात्मिक महत्त्व असल्याचे देखील मानले जाते.
तानसा धरण: नयनरम्य वातावरण आणि शांततेमुळे हे धरण एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. लोक मोठ्या संख्येने येथे शांततेत संध्याकाळ घालवण्यासाठी आणि दिवसा सहलीसाठी येतात.
वसई किल्ला: वसई किल्ला अंदाजे निंबोलीपासून ३० कि.मी अंतरावर आहे. ही १६ व्या शतकातील पोर्तुगीज रचना आहे आणि त्या काळातील अनेक स्मारके आहेत.
रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा
निंबोली हे ठाणे आणि वसईशी राज्य परिवहन बसने जोडलेले आहे. ठाणे निंबोली पासून ५५ किमी (१ तास ३७ मि) आहे.
जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई ६४.९ किमी (२ तास ४६ मिनिटे)
जवळचे रेल्वे स्टेशन: विरार रोड रेल्वे स्टेशन ३१.२ किमी (१ तास)
विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल
ह्या परिसरात भरपूर मराठी शेतकरी समुदाय आणि जमाती आहेत. तुम्हाला येथे आदिवासी आणि महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचे वर्चस्व दिसेल.
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
निंबोलीमध्ये राहण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे पर्यटकांनी वसई विरार किंवा ठाणे येथे राहण्याची सोया करावी.
वसईमध्ये सर्वात जवळचे रुग्णालय २७.२ किमी अंतरावर आहे.
सर्वात जवळचे पोस्ट ऑफिस ३.२ किमी अंतरावर उपलब्ध आहे.
सर्वात जवळचे पोलीस स्टेशन १.६ किमी अंतरावर आहे
स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना
या ठिकाणी वर्षभर जाता येते. पावसाला जाण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. नदीतील प्रवाहांमुळे बुडण्याची अनेक प्रकरणे झाल्याने खबरदारी घ्यावी.
परिसरात बोलली जाणारी भाषा
इंग्रजी, हिंदी आणि मराठी.
Gallery
How to get there

By Road
निंबोली हे राज्य परिवहन बसने ठाणे आणि वसईला जोडलेले आहे. निंबोलीपासून ठाणे ५५ किमी (१ तास ३७ मिनिटे) अंतरावर आहे.

By Rail
जवळचे रेल्वे स्टेशन: विरार रोड रेल्वे स्टेशन ३१.२ किमी (१ तास)

By Air
जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई ६४.९ किमी (२ तास ४६ मिनिटे)
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
No Hotels available!
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS