• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

निवती

निवती हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हा कोकण विभागातील अज्ञात किनाऱ्यांपैकी एक आहे. हा किनारा नारळ आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेला आहे. निवती इथल्या किल्ल्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.

जिल्हा/विभाग        

सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

निवती हे महाराष्ट्रातील दक्षिण कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे. या ठिकाणी पांढऱ्या वाळूचे मिश्रण तसेच खडकाळ किनारे आहेत. हे नारळाच्या झाडांच्या हिरव्या आवरणाने संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीनंतर मराठा नौदल सैन्याला बळकट करण्यासाठी निवती किल्ला बांधला होता.

भौगोलिक माहिती   

निवती हे दक्षिण कोकणातील एक किनारपट्टीचे ठिकाण आहे ज्याच्या एका बाजूला हिरव्यागार सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत आणि दुसऱ्या बाजूला निळा अरबी समुद्र आहे. हे सिंधुदुर्ग शहराच्या नैऋत्येस ४१.८ किमी, कोल्हापूरच्या अग्नेयेस १७६ किमी आणि मुंबईच्या दक्षिणेस ४८३ किमी अंतरावर आहे.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

निवती किनारा बर्‍याच पर्यटकांना माहीत नसल्यामुळे, इथे वॉटर स्पोर्ट्स सारखे उपक्रम होत नाहीत. जर तुम्हाला समुद्राच्या शांततेचा अनुभव घ्यायचा असेल आणि तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून विश्रांती घ्यायची असेल तर तुमच्यासाठी आराम करण्याची ही योग्य जागा आहे.

जवळची पर्यटनस्थळे        

निवतीसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

    • निवती किल्ला: हा किल्ला निवती किनाऱ्याजवळ आहे. हा किल्ला कार्ली खाडी आणि वेंगुर्ला बंदर यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता.
    • भोगावे किनारा: निवतीपासून भोगावे ९.४ किमी अंतरावर आहे. आराम करण्यासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी ही एक शांत जागा.
    • सिंधुदुर्ग किल्ला: हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे आणि पोर्तुगीज शैलीतील वास्तुकलेचा प्रभाव यावर आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाता-पायाचे ठसे दिसतात. निवती किनाऱ्यापासून २८ किमी किमी अंतरावर आहे.
    • तारकर्ली किनारा: स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंगसारख्या जलक्रीडा प्रकारांमुळे या ठिकाणाला कोकणातील ‘किनाऱ्यांची राणी (क्वीन-बीच) म्हणूनही ओळखले जाते.
    • मालवण: निवती समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेस २६.८ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण काजू कारखाने आणि मासेमारी बंदरांसाठी प्रसिद्ध आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

  • निवतीला रस्त्याने जाता येते. हे NH 66, मुंबई गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. राज्य परिवहन बस सिंधुदुर्ग पासून ४४ किमी (१ तास ८ मिनिटे), मुंबई ४८३ किमी (११ तास ३५ मिनिटे), पुणे ४०६ किमी (८ तास २५ मिनिटे) आणि कोल्हापूर १७६ किमी (४ तास १५ मिनिटे) कुडाळ पर्यंत उपलब्ध आहेत. कुडाळपासून निवती २७.३ किमी दूर आहे आणि स्थानिक वाहतुकीद्वारे तिथे पोहोचता येते.
  • जवळचे विमानतळ: चिपी विमानतळ सिंधुदुर्ग १२ किमी (२६ मिनिटे) दाबोलिम विमानतळ गोवा १२७ किमी (३ तास ७ मिनिटे)
  • जवळचे रेल्वे स्टेशन: कुडाळ २९.२ किमी (५५ मिनिटे), सिंधुदुर्ग ३९.१ किमी (१ तास १० मिनिटे)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री अन्न पदार्थ (सी-फुड) येथील वैशिष्ट्य आहे. मालवणी जेवण ही या ठिकाणाची खासियत आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • निवतीजवळ हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत. पर्यटकांना निवास व न्याहरी सारखे पर्यायही इथे उपलब्ध आहेत.
  • सर्वात जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र कुडाळ रस्त्यावर १३.७ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळील पोस्ट ऑफिस तेरवळेवाडी येथे ६.५ किमी अंतरावर आहे.
  • सर्वात जवळचे पोलीस स्टेशन १६ किलोमीटर अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

सर्वात जवळचे MTDC रिसॉर्ट तारकर्ली येथे ३१.२ किमी अंतरावर आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

इंग्रजी, हिंदी, मराठी, मालवणी