राजगड - DOT-Maharashtra Tourism
Breadcrumb
Asset Publisher
राजगड (पुणे)
राजगड, हा भव्य किल्ला १६७२ पर्यंत मराठा साम्राज्याची राजधानी होता. पूर्वी ‘मुरुंबा देवाचा डोंगर’ म्हणून ओळखला जाणारा हा मध्ययुगीन महाराष्ट्रातील अजिंक्य किल्ल्यांपैकी एक असा किल्ला नंतर मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला.
जिल्हे/प्रदेश
पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत.
इतिहास
राजगड, ज्याचा शाब्दिक अर्थ ‘शासकीय किल्ला’ ही छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ व्या वर्षी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची राजधानी होती.
राजगड खालचा किल्ला आणि वरचा किल्ला असे दोन मुख्य भागात विभागलेला आहे. वरच्या किल्ल्यामध्ये बालेकिल्लाचा समावेश आहे, जिथे शाही निवासस्थान होते. खालचा किल्ला डोंगराच्या तीन हातांनी बनलेला आहे. राजगड डोंगराच्या त्रिकोणी उंच सपाटी वर आहे. या तीन कोनांना सुवेळा माची, पद्मावती माची आणि संजीवनी माची अशी नावे आहेत. पद्मावती माचीचे नाव पद्मावती देवीच्या मंदिरावरून आणि त्याच नावाच्या लहान जलाशयावरून ठेवले होते.
राजवाडे आणि घरांचे असंख्य संरचनात्मक अवशेष आणि खांब येथे आजही दिसतात. मराठा साम्राज्याच्या कार्यालयाचे आणि बाजारपेठेचे अवशेष ही येथे आहेत. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. सोळा वर्षांच्या तरुण शिवाजीने किल्ला बांधण्यापासून ते राजा होण्यापर्यंत त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा हा किल्ला मूळ साक्षीदार आहे.
सोळा वर्षांच्या तरुण शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला काबीज केला होता आणि त्यांना तेथे सोन्याचा साठा सापडला होता. फलकात सापडलेल्या सोन्याचा वापर मुरुंबा देवाचा डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी केला जात असे आणि त्यानंतर किल्ल्याचे नाव ‘राजगड’ ठेवण्यात आले. हा किल्ला मराठ्यांची पहिली राजधानी ठरला जिथे राजा आणि त्याच्या सैनिकांनी अनेक वर्षे वास्तव्य केले.
'पद्मावती', 'सुवेळा' आणि 'संजिवनी' या तीन माचींनी सोबत 'बालेकिल्ला' नावाचा एक मोठा किल्ला एकत्रित करून हा किल्ला भव्यपणे व रचनात्मक पद्धतीने
बांधला गेला. तटबंदी इतकी चांगली बनवली गेली की किल्ला आजही सर्वात मोठा आघात सहन करू शकतो, तरीही त्याला इजा होणार नाही. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांचा जन्म झाला, तसेच राणी सईबाई यांचा मृत्यू आणि असे बरेच काही प्रसंग ह्याच किल्ल्यावर वास्तव्य करत असताना झाले. दोन दशकांहून अधिक काळ मराठा साम्राज्याची राजधानी व राजांचा सहवास लाभलेला हा एकमेव किल्ला आहे.
हा किल्ला म्हणजे ट्रेकर्सचे नंदनवन आणि मराठा इतिहासाचा साक्षीदार आहे!
भूगोल
राजगड समुद्रसपाटीपासून १,३९५ मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्तिथ आहे.
हवामान/वातावरण
या प्रदेशात वर्षभर उष्ण-अर्ध शुष्क हवामान असते आणि सरासरी तापमान १९-३३ अंश सेल्सिअस असते.
पुण्यात एप्रिल आणि मे हे सर्वात उष्ण तापमानाचे महिने असतात जेव्हा तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते.
हिवाळ्यात वातावरण अत्यंत तीव्र असतो, आणि रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते, परंतु दिवसाचे सरासरी तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस असते.
या प्रदेशात वार्षिक पावसाळा सुमारे ७६३ मिमी होतो.
करावयाच्या गोष्टी
राजगडावर पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत जसे की,
1.बालेकिल्ला
2.पद्मावती माची
3.सुवेळा माची
4.संजीवनी माची
5.अलु दरवाजा
6.पद्मावती मंदिर
7.गड चढणे / ट्रेकिंग
8.तोरणा, रायगड, प्रतापगड, मंगळगड, लिंगाणा, चंद्रगड इत्यादी किल्ल्यांचे दर्शन घडते.
उन्हाळ्यात रात्री किल्ल्यावर ट्रेकिंग व कॅम्पिंग करु शकतो.
जवळचे पर्यटन स्थळ
राजगड जवळ पाहण्यासारख्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.
1.तोरणा किल्ला (१२ किमी)
2.मांढरदेवी काळूबाई मंदिर (४२ किमी) अंतरावर आहे.
3.पुरंदर किल्ला (४३ किमी) अंतरावर आहे.
रेल्वे, हवाई, रस्त्याने (ट्रेन, उड्डाण, बस) द्वारे पर्यटन स्थळास अंतर आणि आवश्यक वेळ लक्षात घेऊन प्रवास कसा करावा
गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत,
- विमान मार्ग: सर्वात जवळचे विमानतळ पुणे विमानतळ आहे.
- रेल्वे मार्ग: मुंबई ते पुण्याला जाणाऱ्या अनेक गाड्या आहेत.
- रस्त्याने: पुणे शहरापासून किल्ल्याचे अंतर ५६ किमी. पुण्याहून गडावर जाण्यासाठी दीड तास लागतो. एक्स्प्रेस वेने / द्रुतगती महामार्गाने मुंबईहून पुण्याला पोहोचता येईल आणि गडावरचा प्रवास सुरू ठेवता येईल.
विशेष खाद्यपदार्थ आणि हॉटेल
महाराष्ट्रीयन पाककृती
जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/हॉस्पिटल/पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन
निवासाची व्यवस्था स्थानिकांना पूर्व सूचना देऊन केली जाऊ शकते.
●किल्ल्याच्या आवारात किंवा परिसरात एकही रुग्णालय नाही, पुणे शहरात अनेक बहु-विशेषता रुग्णालये आहेत.
●सर्वात जवळचे पोलीस ठाणे राजगड जवळ नसरापूर येथे आहे.
●गडावर पोस्ट ऑफिस नाहीत.
जवळचे MTDC रिझॉर्ट
MTDC रिसॉर्ट पानशेत (३२.५ किमी)
प्रवासी चालकाची माहिती
काही टूर गाईड ऑपरेटर नियोजित टूर करतात ज्यात प्रवास, जेवण आणि राजगड किल्ल्याचा मार्गदर्शित टूर यांचा समावेश असतो.
स्थळास भेटीचे नियम आणि वेळ, भेटण्यासाठीचा सर्वोत्तम महिना
या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिने म्हणजे ऑगस्ट ते मार्च.
-जर एखाद्याने रात्रीच्या ट्रेकिंगची योजना आखली असेल तर उन्हाळ्याचे महिने, एप्रिल ते जून तसेच हिवाळ्यात नोव्हेंबर ते फेब्रुवारी सोईस्कर असतील.
-पावसाळ्याचे पहिले काही आठवडे किल्ल्यावर जाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
-किल्ल्यावर जाताना पर्यटकांनी हवामान आणि हवामानास अनुकूल कपडे घालावेत आणि स्पोर्ट्स शूज घालावेत.
-जर एखाद्याने रात्रीच्या ट्रेकिंगची योजना आखली असेल तर, योग्य कपडे, पुरेशी बॅटरी आणि अतिरिक्त टॉर्च सोबत ठेवावे.
-किल्ल्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी ९.०० वा. ते संध्याकाळी ६.००. सूर्यास्तापूर्वी गड उतरणे उत्तम.
परिसरात बोलली जाणारी भाषा
इंग्रजी, हिंदी, मराठी.
Gallery
How to get there

By Road
By Road : From Pune city to the fort its a distance of 56 KM. It takes about one and half hours to reach the fort from Pune. One may reach Pune from Mumbai via the expressway and continue their journey to the fort.

By Rail
By Rail : There are many trains that run from Mumbai to Pune.

By Air
By Air : The nearest airport is Pune airport.
Near by Attractions
Tour Package
Where to Stay
Tour Operators
MobileNo :
Mail ID :
Tourist Guides
No info available
Subscription
आमचा पत्ता
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र
१५ मजला, नरिमन भवन,
नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१
connect.dot-mh@gov.in
०२२-६९१०७६००
द्रुत दुवे
QR कोड वापरून मोबाइल अॅप डाउनलोड करा

Android

iOS