• स्क्रीन रीडर प्रवेश
  • A-AA+
  • NotificationWeb

    Title should not be more than 100 characters.


    0

Asset Publisher

श्रीवर्धन समुद्रकिनारा (श्रीवर्धन)

श्रीवर्धन हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. हा कोकण विभागातील सर्वात सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. हे ठिकाण हरिहरेश्वर आणि दिवेगर समुद्रकिनाऱ्यांच्या जवळ आहे

जिल्हा/विभाग        

रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत.

ऐतिहासिक माहिती 

श्रीवर्धन हा महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे. हे ठिकाण स्वच्छ आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान असल्याने हे पेशव्यांचे शहर म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला पौराणिक महत्त्व आहे कारण असे मानले जाते की पांडवांपैकी अर्जुनाने वनवासात या ठिकाणी भेट दिली होती.

भौगोलिक माहिती   

श्रीवर्धन हे महाराष्ट्राच्या कोकण भागातील एक किनारपट्टी आहे जिच्या एका बाजूला सह्याद्री पर्वत आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे. हे अलिबाग शहराच्या दक्षिणेस ११७ किमी, मुंबईपासून १८२ किमी आणि पुण्यापासून १६२ किमी अंतरावर आहे.

हवामान       

या प्रदेशातील मुख्य ऋतू म्हणजे पावसाळा. कोकण किनारपट्टीत मुख्यतः जास्त पाऊस (सुमारे २५०० मिमी ते ४५०० मिमी) अनुभवायला मिळतो आणि हवामान दमट आणि उबदार असते. पावसाळ्यात तापमान ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

उन्हाळा गरम आणि दमट असतो आणि तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचते.

इथे हिवाळ्यात तुलनेने सौम्य हवामान (सुमारे २८ अंश सेल्सिअस) असते आणि हवामान थंड आणि कोरडे असते.

करण्यासारख्या गोष्टी        

श्रीवर्धन हे नारळाच्या झाडांनी झाकलेल्या अज्ञात समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. किनारे रुंद आणि शांत आहेत. आराम करण्यासाठी आणि सूर्यास्ताच्या चित्तथरारक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

शनिवार व रविवारच्या सुट्टीसाठी तसेच सहलीसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे.

घोडेस्वारी तसेच घोडे-बग्गी हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

जवळची पर्यटनस्थळे श्रीवर्धनसह खालील पर्यटन स्थळांना भेट देण्याची योजना आपण करू शकता.

  • लक्ष्मी नारायण मंदिर: भगवान विष्णूचे हे मंदिर २०० वर्षांपेक्षा जुने आहे. मूर्ती कलात्मकरीत्या कोरलेली आहे.
  • पेशवे स्मारक: पहिले पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांच्या जन्मस्थळी पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे.
  • दिवेआगर समुद्रकिनारा: श्रीवर्धनच्या उत्तरेस २३ किमी अंतरावर वसलेले हे ठिकाण त्याच्या शांत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे एका सुंदर किनारपट्टी रस्त्याने श्रीवर्धनशी जोडलेले आहे.
  • हरिहरेश्वर: श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यापासून १ किमी दक्षिणेस स्थित, हे ठिकाण प्राचीन शिव आणि काळभैरव मंदिरासाठी ओळखले जाते. हे त्याच्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यासाठी आणि किनारपट्टीच्या धूप प्रक्रियेद्वारे कोरलेल्या विविध भौगोलिक संरचनांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
  • वेळास समुद्रकिनारा: हरिहरेश्वरच्या दक्षिणेला १२ किमी अंतरावर स्थित, जो कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.

रेल्वेने, विमानाने आणि रस्त्याने (ट्रेन, विमान, बस) तसेच ठराविक वेळेत पर्यटन स्थळावर कसे पोहोचावे      

  • श्रीवर्धनला रस्ते आणि रेल्वेने जाता येते. राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH 66), श्रीवर्धनला मुंबई-गोवा महामार्गाशी जोडलेले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस मुंबई, पुणे, हरिहरेश्वर आणि पनवेल ते श्रीवर्धन पर्यंत उपलब्ध आहेत.
  • जवळचे विमानतळ: छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई १३४ किमी
  • जवळचे रेल्वे स्टेशन: माणगाव ४५ किमी (१ तास २४ मिनिटे)

खाद्य वैशिष्ट्य आणि हॉटेल्स        

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात असल्याने समुद्री अन्न पदार्थ येथील वैशिष्ट्य आहे. श्रीवर्धन उकडीच्या मोदकांसाठी प्रसिद्ध आहे.

जवळच्या निवास सुविधा आणि हॉटेल/ हॉस्पिटल/ पोस्ट ऑफिस/पोलीस स्टेशन   

  • इथे राहण्यासाठी अनेक पर्याय हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि निवास व न्याहरी सारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
  • श्रीवर्धन गावात रुग्णालये आहेत.
  • पोस्ट ऑफिस समुद्रकिनाऱ्यापासून ०.६ किमी अंतरावर आहे.
  • पोलीस स्टेशन समुद्रकिनाऱ्यापासून २ किमी अंतरावर आहे.

जवळपासचे एमटीडीसी रिसॉर्ट    

हरिहरेश्वरमध्ये एमटीडीसी रिसॉर्ट उपलब्ध आहे.

पर्यटनासाठीचे नियम आणि वेळ, पर्यटनासाठी योग्य काळ     

  • हे ठिकाण पर्यटनासाठी वर्षभर उपलब्ध आहे. या ठिकाणास भेट देण्याची उत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च पर्यंत आहे.
  • जून ते ऑक्टोबर पर्यंत इथे भरपूर पाऊस असतो आणि उन्हाळा गरम आणि दमट असतो.
  • पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करण्यापूर्वी भरती आणि ओहोटीच्या वेळ तपासून मगच समुद्रात जावे.
  • पावसाळ्यात समुद्राला येणारी भरती धोकादायक असू शकते म्हणून याकाळात समुद्रात जाणे टाळले पाहिजे.

या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या भाषा       

इंग्रजी, हिंदी, मराठी, कोकणी